आपल्याला माहित आहे की अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना पडद्यावर अनेक प्रकारच्या भूमिका या कराव्या लागतात. हेच कारण आहे की बऱ्याच भूमिका पसंद नसताना सुद्धा कलाकारांना साकाराव्या लागतात. या लेखामध्ये आज आम्ही आपल्याला अशा काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत.
ज्यांनी पडद्यावर बहीण भावाची भूमिका केली होती, परंतु वास्तविक जीवनात ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. इतकेच नाही तर पडद्यावर भावाची भूमिका साकारणार्या काही कलाकारांनी लग्न सुद्धा केले आहे तर काही जोडप्यांचा ब्रेकअपही झाला आहे. तर मग चला जाणून घेऊया की हे कलाकार नेमके कोण आहेत.
रोहन मेहरा आणि कांची सिंह:-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत भावाची भूमिका साकारणारा रोहन मेहरा आणि कांची सिंह खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत. शोच्या सेटवरून त्यांच्या अफेअरच्या बातम्या कित्येकदा समोर आल्या होत्या पण या दोघांनीही यावर कधीच काही बोलले नाही.
इतकेच नाही तर या दोघांच्या प्रेमकथेमुळे निर्मातेही अस्वस्थ झाले होते आणि त्याचमुळे रोहनने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर कांचीने सुद्धा हा शो सोडला आणि ती सुद्धा निघून गेली. असे मानले जाते की कांचीनेही रोहनच्या कारणास्तव ये रिश्ता क्या कहलाता ही मालिका सोडली होती.
नीरज मालवीय आणि चारू आसोपा:-
स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ‘मेरे अँगने’ या मालिकेमध्ये सुद्धा नीरज आणि चारू आसोपा हे बहीण भावाची भूमिका साकारत आहेत, शोच्या या दोन्ही भूमिकांना चांगलीच पसंती मिळाली आहे. पण, बहीण भावाची भूमिका साकारत असताना या दोघांनी सुद्धा एकमेकांना हृदय दिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या दोघांनीही साखर पुडा केला होता आणि हे दोघे लग्नही करणार होते, पण नंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले. वास्तविक, चारू आणि नीरज यांच्यात वाद झाला. पण आपणास आम्ही सांगू इच्छितो की चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनशी लग्न केले आहे.
मयंक अरोरा आणि रिया शर्मा:-
स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ‘तू सूरज मैं सांझ पिया जी’ या मालिकेत बहीण भावाची भूमिका करणारे मयंक आणि रिया खऱ्या आयुष्यात एक झाले आहेत. शूटिंगच्या सेटवर या दोघांमधील प्रेम वाढलं आणि मग दोघांनी एकमेकांसमवेत वेळ घालवायला सुरुवात केली.
असा विश्वास आहे की आता दोघेही लवकरच लग्न करू शकतात. आपणास सांगू इच्छितो की या दोघांच्या अफेअरच्या अनेक बातम्या टीव्ही वर येत होत्या. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असून, ही जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.
अमन वर्मा आणि वंदना लालवाणी:-
सीरियल शपथ मध्ये एकीकडे अमन वर्मा आणि वंदना लालवानी भाऊ-बहिणीची भूमिका साकारत आहेत तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यात या दोघांमध्ये प्रेमाचे रंग उधळले जात आहेत. या दोघांनी बऱ्याच वेळा एकमेकांना डेट केले आहे आणि मग त्यांनी नंतर लग्न सुद्धा केले.
दोघेही बर्याचदा शूटिंग सेटवर क्वालिटी टाईम घालवताना आपल्याला दिसत असतात, यामुळे शो मेकर्स सुद्धा खूप नाराज झाले आहेत. तथापि, आज सुद्धा ते एकत्र आहेत आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात.