संजू बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय दत्तचे आज बॉलिवूडमध्ये तसेच या जगामध्ये लाखो असे चाहते आहेत. आपल्याला माहित आहे की संजय दत्तवर एक बायोपिक अवघ्या 2 वर्षांपूर्वी बनली होती. हा चित्रपट बऱ्याच प्रमाणत यशस्वी झाला आणि सुपरहिट देखील बनला.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. हा चित्रपट जेव्हा संजय दत्तच्या आयुष्यावर बनला होता तेव्हा संजय दत्तच्या आयुष्याशी संबंधित अनेक न पाहिल्या गेलेल्या आणि न ऐकल्या गेलेल्या कथा या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आल्या. पण आज आम्ही तुम्हाला संजय दत्तच्या जीवनाशी संबंधित असे एक रहस्य सांगणार आहोत.
जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्याला माहित असेल की संजय दत्तच्या आयुष्यात बर्याच अभिनेत्री होत्या आणि त्यापैकी त्याने तिघांशी लग्न केले. संजयचे पहिले रिचा शर्माशी लग्न झाले होते. पण रिचाच्या निधनानंतर मॉडेल रिया पिल्लई संजय दत्तच्या आयुष्यात आली.
मुंबई बॉ-म्बस्फो-ट प्रकरणी खटला चालू असताना रिया संजय दत्तसोबत होती. पण त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती की संजय दत्तला तु-रुंगात जावे लागले आणि सुटल्यानंतर त्याने रियाशी लग्न केले. अशा परिस्थितीत लग्नानंतर संजय सुधारेल असा विचार होता पण असे झाले नाही.
लग्नानंतर संजय दत्तने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि त्यादरम्यान त्याने विश्वाससुंदरी सुष्मिता सेन हिच्याबरोबर एक चित्रपट साइन केला. वास्तविक, सुष्मिता सेन आणि संजय दत्त एका स्टेज शोमध्ये भेटले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संजय दत्त आणि सुष्मिता सेन त्यांच्या दोन भेटीनंतरच एकमेकांच्या अगदी जवळ आले होते.
तसेच ते जर दोघे देशाबाहेर भेटले तर ते एकाच हॉटेलमध्ये राहत असत. याव्यतिरिक्त, संजय दत्तने सुष्मिता सेनला अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना चित्रपटांमध्ये घेण्याची शिफारस केली. या सर्व गोंधळात संजयची पत्नी रियाला मात्र या सर्व गोष्टी माहित नव्हत्या. खरं तर संजय दत्तवर तिचा पूर्ण विश्वास होता.
पण त्यानंतर संजय दत्तने पुन्हा इतकी मोठी चूक केली की या एका चुकीमुळे दोघांचेही जीवन बदलले. संजयच्या आयुष्यात असे काहीतरी घडले की त्याचा पुन्हा घटस्फो-ट झाला आणि रियाने त्याला सोडले. संजय आणि सुष्मिता जेव्हा परदेशात एकत्र होते, तेव्हा नुकतीच मिस युनिव्हर्स बनलेल्या सुष्मिताची मुलाखत घेण्याची एका पत्रकाराला इच्छा होती.
आणि या संदर्भात पत्रकार बर्याच दिवसांपासून हॉटेलच्या लॉबीमध्ये तिची वाट पाहत होता. यावेळी त्याने पाहिले की संजय आणि सुष्मिता दोघे एकत्र येत आहेत. त्यानंतर पत्रकाराला त्या दोघांची मुलाखत घ्यायची होती. पण जेव्हा पत्रकाराने संजय दत्त आणि तिचे फोटो मागितले तेव्हा संजय दत्त खूप चिडला. कदाचित त्याचे रहस्य उघड करण्यास संजय दत्त घाबरला असेल.
अशा परिस्थितीत संजय दत्तने रिपोर्टरला हॉटेल सोडण्यास सांगितले, पण रिपोर्टर त्याची बाजू मांडत राहिला. या पत्रकाराने संजय आणि सुष्मिताची अनेक छायाचित्रे सुद्धा घेतली. त्यानंतर मात्र संजयचा पारा चढला आणि त्याने रिपोर्टरला मारहाण करण्यास सुरवात केली. संजय दत्तने कॅमेरा देखील फोडला आणि यानंतर संजय आणि सुष्मिता दोघेही त्यांच्या खोलीत गेले.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना वर्तमान पेपरमध्ये त्यांचे बोल्ड हॉटेलमधले फोटो दिसले हे पाहून त्यांना देखील आश्चर्य वाटले आणि या घटनेनंतर संजय आणि सुष्मिता यांच्यातील संबंध समोर आले. ही बातमी पाहून संजयची पत्नी रियादेखील खूप चिडली. अशा परिस्थितीत ती संजयकडे बातमीचे पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी गेली. रिया लंडनला येत आहे. हे जेव्हा सुष्मिताला कळले तेव्हा ती तिची बॅग पॅक करते आणि तेथून ती पळ काढते.
पण तरी देखील संजय दत्तने सुष्मितासोबतचे प्रेमसं-बंध कबूल केले आणि रियाकडे माफी मागितली. रियाने संजय दत्तला माफ केले असले तरी यानंतर त्यांचे सं-बंध तुटले. पण सुष्मिता गेल्यानंतर संजय दत्तने अनेक संघर्षशील अभिनेत्रीबरोबर फ्लर्ट करणे सुरू केले. अशा परिस्थितीत रियाने तिचे संजयसोबतचे दहा वर्षांचे संबंधही तोडले. त्यानंतर संजय दत्तने मान्याशी लग्न केले आणि आता तो मन्याता आणि दोन मुलांसमवेत खूप आनंदी आयुष्य जगत आहे.