8 महिन्याच्या प्रेग्नेंट पत्नी सोबत फौजी पती ने केला असा कांड कि, फोन वर म्हणाली ‘पप्पा प्लिज मला इथून घेऊन चला तो मला ‘….’

Entertenment

हुंडा ही एक अशी प्रथा आहे जी आपल्या समाजासाठी एका शापासारखी आहे. असे असूनही, अनेक लोकांनी आज ही प्रथा दीर्घ काळापासून जिवंत ठेवली आहे. भारतीय कायद्याबद्दल बोलायचे झाले तर, हुंडा घेणे आणि हुंडा देणे या दोन्ही गोष्टी सुद्धा एका मोठा गुन्हा मानला जातो.

असे असूनही लोक हुंडा घेणे आणि हुंडा देणे चुकीचे मानत नाहीत. ज्यामुळे आज बरीच कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. यासह हुंड्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य सुद्धा उध्वस्त झाले आहे. नुकतेच हुंड्याशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक प्रकरण आज लोकांसमोर आले आहे.

हुंड्याशी संबंधित ही घटना ऐकल्यानंतर आपलेही रक्त उसळून उठेल. चला तर या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया- हुंड्याशी संबंधित ही बाब गुरदासपूरची आहे. जिथे एक महिला जवळपास 8 महिन्यांपूर्वी लग्न करून सासरच्याकडे आली होती.

सासरी आल्यानंतर काही दिवसांपर्यंत सर्व काही ठीक होते, परंतु काही दिवसानंतर सासरच्यांनी हुंड्यावरून मुलीवर दबाव आणण्यास सुरवात केली. गावचे सरपंच हरप्रीत सिंग यांच्या मते, हरजितसिंग यांची मुलगी मनजित कौर हिचे 22 ऑक्टोबर 2017 रोजी सिमरनशी लग्न झाले होते.

लग्नाच्या वेळी मनजीतच्या वडिलांनी सुद्धा मुलाला त्याच्या स्टेटसनुसार हुंडा दिला आणि मग हुंडा घेतल्यानंतर त्या वेळी त्या मुलाने लग्नाची तयारी दर्शविली. लग्न करण्यास सहमती दिल्यानंतर या दोघांनी सुद्धा मोठ्या धामधुमीत लग्न केले.

पण लग्नाच्या काही दिवसानंतर तिच्या सासरच्यांनी पुन्हा हुंड्यासाठी मनजितला त्रास देणे सुरू केले. असे म्हटले जाते की हुंड्यामुळेच मनजीतचे सासरचे लोक तिला मारपीट आणि अत्याचार करायचे. मनजीतच्या वडिलाच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर मनजीतचे सासरचे लोक एक तर मुलीला परत घेऊन जायला सांगायचे.

किंवा पैसे आणि हुंड्याची मागणी करून त्रास द्यायचे. पण आता आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या मुलाशी मनजीतचा विवाह झाला होता तो मुलगा सैन्यात कार्यरत आहे. सैन्यात असूनही त्या मुलाने आपल्या पत्नी व तिच्या वडिलांना हुंड्यासाठी भाग पाडले.

शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार असे सांगितले जात आहे की दोन दिवसांपूर्वी मनजितचा पती तिच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर पत्नीशी भांडण झाल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यावर निघून जातो. पण दुसर्‍याच दिवशी त्या मुलीने फोन करून सांगितले की सासरचे लोक तिला मारहाण करत आहेत.

आणि जर तिला लवकरच कोणतीही मदत न मिळाल्यास ते तिला ठार सुद्धा करतील. मुलीचे हे बोलणे ऐकल्यानंतर तिचे वडील घाईघाईने आपल्या मुलीच्या घरी पोहोचले पण आपल्या मुलीच्या घरी पोहचल्यावर मनजितच्या वडिलांना मोठा धक्काच बसला.

मनजितच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मुलीचा मृतदेह घराच्या लॉबीमध्ये ठेवला होता. लॉबीमध्ये आपल्या मुलीचा मृतदेह पडलेला पाहून त्यांनी त्वरित पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मनजितचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या सासरच्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पण असे सांगितले जात आहे कि गुन्हा दाखल केल्यानंतर तिच्या सासरचे लोक फरार झाले आणि पोलीस अजून सुद्धा त्याचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *