बॉलिवूड स्टार्स समाजातील बंधने तोडुन समाजात नवीन नियम आणण्यासाठी ओळखले जातात. बॉलिवूड चित्रपटांनी भारतातील अनेक अनिष्ट प्रथांचा नाश केला आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड चित्रपटांनी अनेक लोक प्रभावित झाले आहे आणि आपल्या आयुष्यात चित्रपटातून प्रेरणा घेऊन ते पुढे गेले आहेत.
असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की समाजात होणारे बदल आणि विचारांमधील मोकळेपणा हे सर्व बॉलीवूडमुळे झाले आहे. असे अनेक प्रश्न आहेत जे बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोडलेल आहेत. मग ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे असो, किंवा मुलींचे लहान कपडे घालने. बॉलिवूडने जीवनशैली बदलली आहे.
त्याचबरोबर बॉलिवूडने प्रेमाची व्याख्या बदलली आहे. चित्रपटसृष्टीशीत असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अनोख्या प्रेम प्रकरणांसाठी ओळखले जातात. बॉलिवूडच्या बर्याच अभिनेत्रींनी घटस्फो टित पुरुषांशी लग्न केले आहे. पण तुम्हाला माहित आहे आहे का बॉलिवूडच्या कोण-कोणत्या अभिनेत्यांनी घटस्फो टित महिलांसोबत लग्न केले आहे. या यादीमध्ये बरीच मोठी नावे आहेत. चला तर याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया ..
संजय दत्त आणि मान्यता दत्त:
या यादीतील पहिले सर्वात मोठे नाव संजय दत्तचे आहे. संजू बाबाचे नाव अनेक अभिनेत्रींशी संबंधित होते, परंतु संजय दत्तने मान्यता दत्तशी लग्न केले आहे. मान्यताचे यापूर्वीही लग्न झाले होते. तिच्या पहिल्या पतीचे नाव मिराज-उर-रहमान आहे. मान्यताचा पती मिराज याने त्यांचे लग्न बेकायदेशीर ठरवत दोघांनाही कोर्टात ओढले होते. मिराजचे म्हणणे होते की त्याने अद्याप मान्यताला घटस्फो ट दिला नाही. मात्र, को र्टाने मिराजची याचिका फेटाळली आणि संजय दत्त आणि मान्यतचे लग्न वैध्य ठरवले.
मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बालीः
डिस्को डान्सर म्हणून लोकप्रिय मिथुन चक्रवर्तीला सर्वचजण ओळखता. घटस्फो टित महिलेसोबत लग्न करण्याच्या यादीमध्ये त्याचे देखील नाव आढळते. मिथुनने योगिता बालीशी लग्न केले आहे. योगिता बाली बॉलिवूडची सदाहरित गायक किशोर कुमारची तिसरी पत्नी होती. योगिता बाली आणि किशोर कुमार यांचे 1976 मध्ये लग्न झाले होते पण 1978 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर मिथुनने 1979 मध्ये योगितासोबत लग्न केले. मिथुन आणि योगिताला चार मुले आहेत.
अनुपम खेर आणि किरण खेर:
बॉलिवूडचे बबली कपल म्हणून ओळखल्या जाणार्या जोडीची कहाणी देखील अशीच आहे. अभिनेता अनुपम खेरने घटस्फो टित किरण खेरशी लग्न केले आहे. किरणचे पहिले लग्न मुंबईतील व्यावसायिका गौतम बेरीशी झाले होते, परंतु 1985 मध्ये दोघांनी घटस्फो ट घेतला. त्याच वर्षी अनुपम खेरने किरण खेरसोबत लग्न केले. अनुपम खेर आणि किरण खेर थिएटरच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर अनुपमने किरणच्या पहिल्या लग्नात जन्म झालेल्या सिकंदर या मुलाला दत्तक घेतले.
गुलजार आणि राखीः
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनीदेखील घटस्फो टित अभिनेत्री राखीसोबत लग्न केले. राखीने अजय बिस्वास नावाच्या बंगाली चित्रपट दिग्दर्शकासोबत लग्न केले होते. मात्र, गुलजार आणि राखीचे नाते लग्नानंतर फक्त एक वर्ष टिकले. त्यांनी कधीही घटस्फो ट घेतला नाही. ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांचे वेगळे होण्याचे कारण म्हणजे यश चोप्राच्या ‘कभी कभी’ या सिनेमात राखीने साइन केले होते. राखीने याबाबत गुलजारला माहिती दिली नव्हती. सध्या राखी आणि गुलजार यांना मेघना गुलजार नावाची एक मुलगी आहे. आज ती बॉलिवूडमध्ये खूप मोठी दिग्दर्शक आहे.
समीर सोनी:
समीर सोनीने त्याचे पहिले लग्न प्रसिद्ध भारतीय मॉडेल राजलक्ष्मी खडविलकरसोबत केले होते. समीरचे पहिले लग्न 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकले नाही. यानंतर समीरने ज्या महिलेशी लग्न केले तिचा घटस्फो ट झालेला आहे . तिचे नाव नीलम कोठारी आहे. नीलम कोठारी बॉलिवूडमधिल खूप मोठी अभिनेत्री होती. नीलमचे पहिले लग्न ब्रिटिश व्यावसायिक ऋषि सेठियाशी झाले होते. दोघांनी लग्नाच्या एक वर्षानंतर अहाना नावाच्या मुलीला दत्तक घेतले.
राहुल रॉय:
समीर सोनीशी घटस्फो ट घेतल्यानंतर मॉडेल राजालक्ष्मी खडविलकरने आशिकी फेम हीरो राहुल रॉय ला डेट केले. 2000 मध्ये राहुल रॉयने राजलक्ष्मीसोबत लग्न केले. परंतु 2004 मध्ये ते वेगळे झाले.
लिअँडर पेस आणि रिया पिल्लई:
या यादीतील शेवटचा क्रमांक हा बॉलिवूड अभिनेत्याचा नसून लिअँडर पेस नावाच्या प्रसिद्ध टेनिसपटूचा आहे. लिअँडर पेस हा संजय दत्तची पहिली पत्नी रिया पिल्लईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. या नात्यातून त्यांना अजयाना पेस नावाची एक मुलगीही आहे. पेस आणि रिया आता एकत्र राहत नाहीत. पेस आता टेनिस खेळतो. पेस 45 वर्षांचा झाला आहे परंतु अजुनही त्याने टेनिसचा निरोप घेतलेला नाही.